टीम लोकक्रांती
आढळगाव, श्रीगोंदा | दि.१६ मार्च २०२३ :
श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथील अमोल ज्ञानदेव शिंदे यांच्या घरासमोरील नारळाच्या झाडावरती आज गुरुवार दि.१६ मार्च रोजी सायंकाळी ६:३० वा. वेळेच्या सुमारास अवकाळी पावसाच्या वादळी वाऱ्यामध्ये वीज पडून घरा समोरील नारळाच्या झाडांचे नुकसान झालेले आहे.
यामध्ये कुठलीही जीवित हानी झालेली नाही अशी माहिती मिळाली आहे. यामध्ये दारा अमोरील नारळाच्या झाडांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. हातातोंडाशी आलेला घास निसर्गाच्या अवकृपेने हिसकावून घेतला जात आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन ज्या पिकांवर अवलंबून आहे ते आशा वातावरणामुळे वाया जात असेल तर शेतकऱ्यांचे जीवन बेभरवशाचे झाले आहे असेच म्हणावे लागेल.
लोकक्रांती वृत्तांकन