लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ११ जुलै २०२४ :
श्रीगोंद्याचे ग्रामदैवत संतश्रेष्ठ शेख महंमद महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह लिखाण केल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड व ग्रामस्थ यांचे पोलीस अधीक्षक व पोलीस निरीक्षक यांना दि. ११ जुलै रोजी निवेदन देण्यात आले.
श्री शेख महंमद महाराज यांचा पालखी सोहळा सध्या पंढरपूर कडे मार्गस्थ आहे या पालखीचे सर्वत्र जंगी स्वागत होत आहे समतेचा,एकतेचा आणि शांततेचा संदेश घेऊन निघालेली ही पालखी अनेकांना मंत्रमुग्ध करत आहे.दि ९ जुलै रोजी फेसबुक वरील वारकरी संप्रदाय या ग्रुपवर मदन जैस्वाल, प्रशांत भालोडकर व दिनेश पाटील या समाजकंठकांनी एक मुस्लिम संत बहुसंख्य हिंदूंचे ग्रामदैवत कसे असू शकते या कारणास्तव आक्षेपार्ह लिखाण करून समस्त श्रीगोंदा वासीयांच्या भावना दुखावल्या आहेत.
या घटनेचा सर्वत्र तीव्र निषेध होत आहे. सामाजिक तेढ निर्माण करण्याच्या उद्देशाने चुकीच्या पोस्ट करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीचा मुळासकट बिमोड होऊन संबंधीत लोकांवर गुन्हा दाखल व्हावा म्हणून आज पोलीस अधीक्षक व पोलिस निरीक्षक यांना निवेदन दिले असून .मागण्या मान्य न झाल्यास गाव बंदचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे यांनी दिला आहे.
यावेळी सांभाजी ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी, शेख महंमद दर्गा ट्रस्ट व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.