लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ११ जुलै २०२४ :
आढळगाव ग्रामपंचायतच्या सरपंचा वरील अविश्वास ठराव तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांच्या उपस्थितीत पुरेश्या संख्ये अभावी नामंजूर झाला. दहा ग्रामपंचायत सदस्यांनी दि.५ रोजी तहसील कार्यालय येथे सरपंच उपसरपंच यांच्यावर अविश्वास ठराव दाखल केला होता. दिनांक १० जुलै रोजी ठराव मंजूर करताना आढळगाव ग्रामपंचायत येथे तहसीलदार सौ क्षितिजा वाघमारे यांच्या उपस्थिती मध्ये पुरेसे संख्याबळ नसल्याने अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला.
सन २०२१ मध्ये झालेल्या आढळगाव ग्रामपंचायत निवडणुकीत ग्रामपंचायतीचे सरपंच पदी शिवप्रसाद उबाळे व उपसरपंच पदी अनुराधा ठवाळ हे विराजमान झाले.त्यांच्या कार्यकाळात ते इतर सदस्यांना विश्वासात न घेता कामकाज करत असल्याने तेरा सदस्यांपैकी दहा सदस्यांनी दि. ५ जुलै रोजी तहसील कार्यालयात त्यांच्या विरुद्ध अविश्वास ठराव दाखल केला होता.
तहसीलदार क्षितिजा वाघमारे यांनी तातडीने नोटीसा बजाऊन दि.१० जुलै रोजी सभा बोलवली ठराव मंजूर होणेसाठी ठरावाच्या बाजूने दहा सदस्य आवश्यक असताना नऊच सदस्य उपस्थित असल्याने पुरेशे संख्याबळ नसल्याने ठराव नामंजूर करण्यात आल्याचे तहसिल क्षितीजा वाघमारे यांनी घोषीत केले.
या वेळी १३ पैकी ९ सदस्य उपस्थित होते तर सरपंच उपसरपंचासह चार सदस्य अनुपस्थित होते.
अविश्वास ठराव नामंजूर करण्यात आला असल्याने सरपंच शिवप्रसाद उबाळे उपसरपंच सौ अनुराधा ठवाळ यांच्या वरील धोक्याची घंटा तळली असेच म्हणावे लागेल.