लोकक्रांती
श्रीगोंदा, दि २९ जुलै २०२४ : राज्यपातळीवरील अनेक नेते मी विधानसभा निवडणूक लढवावी या दृष्टीने सकारात्मक आहेत श्रीगोंदा विधानसभा मतदार संघातील सर्व गावांमधून मला उस्फूर्त पाठिंबा आहे श्रीगोंदा तालुक्यातील सर्वच नेत्यांना आजपर्यंत मी अनेक निवडनुकात मदत केली असल्याने त्याची परतफेड या नेत्यांनी करावी. मी विधानसभा निवडणूक कोणत्याही परिस्थितीत सर्व ताकदीनिशी लढविणार असल्याची घोषणा अहमदनगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषदेत केली.
आगामी दोन महिन्यात विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यात सर्वाधिक चुरस श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात दिसून येते. विधानसभा निवडणूकीत अण्णासाहेब शेलार यांनी उडी घेतल्यामुळे श्रीगोंदा विधानसभा मतदार संघाचे राजकीय समिकरणे बदलणार आहेत. श्रीगोंदा तालुक्याचे आराध्य दैवत संत शेख महंमद महाराज यांची पुजा करुन अण्णासाहेब शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली.
यावेळी अण्णासाहेब शेलार पुढे म्हणाले, आपण यापूर्वी आ. बबनराव पाचपुते यांना नेते मानून त्यांना अनेक विधानसभा निवडनूकीत तसेच अन्य निवडणुकात मदत केली आहे. स्व. शिवाजीराव नागवडे यांना साखर कारखान्याच्या निवडणुकीत मदत केली, स्व. नागवडे यांच्या स्नुषा सौ. अनुराधाताई नागवडे यांच्या साठी मी. जि. प. चा उपाध्यक्ष असताना तसेच विध्यमान जि. प. सदस्य असताना थांबलो आणि त्यांना जि. प. सदस्य केले २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत माजी. आ. राहुल जगताप यांना विधानसभेत पाठविण्यासाठी मदत केली. मागील विधानसभा निवडणुकीत घनःश्याम शेलारांना मदत केली.या सर्व नेत्यांवर मला मदत करण्याची जबाबदारी आहे.
यावेळी अण्णासाहेब शेलार पुढे म्हणाले, मी माझ्या राजकीय जिवनातली शेवटची निवडणूक लढविणार आहे. विजयी झालो तरी पुढील विधानसभा निवडणुकीत मी दुसऱ्याला संधी देणार आहे. पराजित झालो तरी ही पून्हा कोणतीच निवडणूक आयुष्यात लढविणार नाही हा शब्द मी श्रीगोंद्यातील आम जनतेला देतो. साजन पाचपुते, बाळासाहेब नाहाटा व दत्तात्रय पानसरे माझे खास मित्र आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीत या तिन्ही मित्रांनी मला मदत केली तर त्यांचे भविष्य उज्वल करण्यासाठी आपण प्रयत्न करु असेही अण्णासाहेब शेलार पत्रकार परिषदेत म्हणाले.आपण तडजोडीतील उमेदवार असू असा अपप्रचार भविष्यात होवू शकतो मात्र श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघातील आम जनतेला आठवण करून देवू इच्छितो की मी आ. पाचपुते यांचा कार्यकर्ता असताना २००९ साली बंड करून अपक्ष उमेदवारी केली. उमेदवारी मागे घेण्यासाठी त्यावेळी मला अनेक प्रलोभणे दाखविली. मात्र मी निवडणुकीवर ठाम होतो. ती निवडणूक लढवून दाखविली.
यावेळी मी निवडणूक लढविणार आहे या मतावर ठाम असून या निवडणुकीची सर्व तयारी मी पूर्ण केली असल्याचा विश्वास ही शेलार यांनी व्यक्त केला.यावेळी अण्णासाहेब शेलार पुढे म्हणाले दोनदा मला जि. प. उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली. पाच वर्षे मिळालेल्या संधीचे सोने केले. तालुक्यासह जिल्हयात मी अनेक ठिकाणी शाळा खोल्या, रस्ते तसेच अनेक पायाभूत योजना राबविल्या. श्रीगोंदा तालुक्यात जो मी माझ्या राजकीय जीवनात विकासाचा पाया रचला त्या बळावर मी विधानसभा निवडनूक लढविनार आहे.
कुकडी व घोड पाटपाण्याचा विषय दिवसेन दिवस जटिल बनत चालला आहे. पाण्याचे न्याय पदधतीने वाटप होत नाही. श्रीगोंदा तालुक्यावर सातत्याने अन्याय होतो. समन्याय पद्धतीने पाणी वाटप व्हावे तसेच कुकडीचे दोन जास्तीचे आर्वतन होण्यासाठी डिंबे ते माणिकडोह बोगदा होणे गरजेचे आहे. घोड धरणातील गाळ काढून धरणाची ऊँची वाढविण्यासाठी तसेच अनेक प्रलंबित प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी मला विधानभवनात जायचे असल्याचे अण्णासाहेब शेलार म्हणाले.
यावेळी बोलताना अण्णासाहेब शेलार पुढे म्हणाले की विसापुर धरणातील शेतकऱ्यांची नियमित अडवणूक होते. विसापुरचा समावेश कुकडी प्रकल्पात व्हायचा असेल तर त्याला राजकीय पाठबळ असणे गरजेचे आहे. आमदारकीच्या रूपाने ते राजकीय पाठबळ मला मिळाले तर विसापुरचा पाणीप्रश्न मी सोडून दाखवतो. बेलवंडी येथे एम. आय. डी.सी. मंजूर झालेली आहे. शासनाणे त्यासाठी जागा उपलब्ध करून दिली
आहे. श्रीगोंदा व नगर तालुक्यातील बेरोजगारी दूर करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी मोठा औद्योगिक प्रकल्प आणण्याचा माझा मानस आहे. या सर्व प्रश्नांसाठी मला विधानसभेत जाणे गरजेचे आहे.
चौकट
राज्यातील नेते माझ्या उमेदवारीविषयी सकारात्मक राष्ट्रीय तसेच राज्यपातळी वरील नेते माझ्या अनेक महिन्यापासून संपर्कात आहेत. श्रीगोंदा विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारी करावी म्हणून आग्रही आहेत. कोणत्या पक्षाकडून उमेदवारी करायची याबाबत मी चाचपणी करत असून त्याचा तिढा ही लवकर सुटेल. पक्षपातळीवर उमेदवारीचा तिढा सुटला नाहीतर मात्र मी अपक्ष विधानसभेची उमेदवारी करण्यावर
ठाम आहे.
चौकट
शेवटची निवडनूक यावर मी ठामच… सध्या मी पुर्णपणे मोकळा आहे, माझ्या कडे पुर्णवेळ आहे. माझ्याकडे कोणतेच पद नाही. मी कोणत्या पक्षातही नाही. माझ्याकडे कोणतीही शैक्षणिक संस्था नाही.
तालुकास्तरावरील सहकारी संस्था नाही. त्यामुळे मी आमदारकीला पुर्णवेळ देवून न्याय देवू शकतो. माझ्या राजकीय जीवनातील ही शेवटची निवडणूक आहे. विधानसभा जिंकलो किंवा हरलो तरी दुसऱ्याला संधी देणार. आगामी विधानसभा निवडणूक सोडता यापुढे भविष्यात मी कोणतीच निवडणूक लढणार नाही.