श्रीगोंदा, ता. १ : शेख महम्मद महाराज मंदिरात सामाजिक सलोखा राखण्यासाठी श्रीगोंद्यातील काही तरुण आणि जेष्ठ नागरिकांनी पुढाकार घेऊन दि. ३१ जानेवारी रोजी सायंकाळी बैठकीचे आयोजन केले होते
श्रीगोंद्यात काही दिवसापूर्वी दोन गटांमध्ये किरकोळ कारणा मधून वाद झाला होता त्या घटनेनंतर एकाचा मृत्यू झाला होता पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली मात्र आता या प्रकरणात राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर भाजपचे मंत्री नितेश राणे श्रीगोंद्यात येणार असून मोर्चाचे आयोजन केले आहे त्यामुळे नितेश राणे यांनी श्रीगोंद्यात येऊन हिंदू मुस्लिम एक्य बिघडवण्याचे काम करू नये यासाठी तालुक्याचे आमदार तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना भेटून निवेदन देणार असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले तर अनेकांनी बैठकीवेळी आपले मत मांडले
श्रीगोंदा शेख महम्मद बाबांची भूमि आहे येथे शेकडो वर्षांचा हिंदू मुस्लिम सामाजिक सलोखा असल्यामुळे श्रीगोंद्यात येऊन कोणीही हिंदू मुस्लिम एक्या बिघडवू नये
ज्यांना श्रीगोंद्यात यायचे आहे त्यांनी जरूर यावे श्रीगोंद्यात येऊन शेख महम्मद महाराज यांचे दर्शन घेऊन त्यांचे विचार घेऊन जावेत असे मत या बैठकीवेळी अनेकांनी व्यक्त केले
या बैठकीस माजी नागराध्यक्ष मनोहर पोटे, सामाजिक कार्यकर्ते टिळक भोस, माजी नगरसेवक अख्तर शेख, माजी उपनगराध्यक्ष राजू गोरे, स्मितल वाबळे, नगरसेवक निसार बेपारी,एम डी शिंदे, सुधीर खेडकर, अशोक आळेकर, नगरसेवक संतोष कोथिंबीरे, ऋषिकेश गायकवाड, नानासाहेब शिंदे, शिवसेनेच्या मीराताई शिंदे, संभाजी ब्रिगेडचे अरविंद कापसे, नंदू ससाणे, संतोष खेतमाळीस, प्राध्यापक बळे सर, गोपाळ मोटे पाटील, सोनू कोथींबीरे, अमीन शेख, चिनू शेख, समिती बोरुडे, आडवोकेट जराड, अविनाश घोडके आदी मान्यवर उपस्थित होते तर हिंदू मुस्लिम समाजातील अनेक तरुण आणि जेष्ठ नागरिक या बैठकीस उपस्थित होते