श्रीगोंदा माध्यमिक विद्यालयाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न..!

श्रीगोंदा, ता. ९ : शहरातील श्री स्वामी समर्थ ग्रामविकास प्रतिष्ठानचे श्रीगोंदा माध्यमिक विद्यालय श्रीगोंदा येथे इ. १० वी च्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब शेलार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे निरीक्षक प्रा.विलासराव जाधव सर, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय आनंदकर सर,वडाळी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापकआप्पासाहेब वागस्कर हे उपस्थित होते.

याप्रसंगी इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व उपस्थित मान्यवारांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. यावेळी उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी तसेच आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत नैपुण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच बाळासाहेब शेलार, विलासराव जाधव सर,संजय आनंदकर सर,मुख्याध्यापक जामदार सर, उत्तमराव भुजबळ सर,श्रीमती भाग्यश्री काकडे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी केले व आभार क्रीडा शिक्षक राजेंद्र जामदार सर यांनी मानले .

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
57 %
5.8kmh
79 %
Mon
34 °
Tue
33 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
33 °
error: Content is protected !!