लिंपणगाव येथील शेतकऱ्यांचे तहसील समोर शेतीमालाला हमीभाव मिळण्यासाठी आमरण उपोषण!

टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.२७ सप्टेंबर २०२२ : कांद्याच्या कमित कमी उत्पादन खर्चापेक्षा जास्त बाजारभाव म्हणजेच कमित कमी ३० रु किलो या बाजारभावाप्रमाणे दर देण्यात यावा यासाठी लिंपनगाव श्रीगोंदा येथील शेतकरी पोपट माने ,नंदकुमार ठोमसकर ,निलेश करुमकर, सुदाम पवार,बबनराव भगत,किरण कुरुमकर, संदीप काळे,संदीप कणसे,आप्पा श्रीराम,राज पंधरकर,इ शेतकरी यांनी तहसिल कार्यालयात समोर आमरण उपोषण सुरु केले आहे.

वाढत्या महागाईने शेतकरी पूर्ण हैराण झालेला आहे खते बी बियाणे औषधे हा खर्च आटोक्या बाहेर गेलेला आहे आणि त्यामध्ये एवढा खर्च करूनही जर शेतमालाला योग्य बाजार भाव मिळत नसेल तर शेतकऱ्याला मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शासनाने हमीभावाबद्दल गांभीर्याने विचार करावा अशी मागणी आंदोलनात होत आहे.

या उपोषणाला प्रहार संघटणा तालुका अध्यक्ष सुरेशशेठ सुपेकर , विजय शेंडगे तालुका उपाध्यक्ष, माधवराव बनसुडे माजी शहरअध्यक्ष प्रहार संघटना यांनी पाठिंबा दिला.
स्त्रोत:(प्रसिद्धी पत्रक)

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
overcast clouds
28.7 ° C
28.7 °
28.7 °
59 %
6.1kmh
96 %
Sun
33 °
Mon
34 °
Tue
32 °
Wed
33 °
Thu
34 °
error: Content is protected !!