टीम लोकक्रांती | दि.८ जून २०२३ :
Onion Price : कोरोना कालखंडापासून आजतागायत महाराष्ट्रात कांद्याला म्हणावे असे भाव मिळाले नाहीत परंतु आता दरवाढीत थोडी सुधारणा झाली आहे. येथील काही मंडईंमध्ये सुपर क्वालिटी कांद्याचा भाव १५ रुपये किलोवर पोहोचला आहे. तरीही शेतकऱ्यांना म्हणावा असा फायदा मिळत नसल्याचं चित्र आहे. कोल्हापूर, केडगाव, सातारा, राहता, जुन्नर, हिंगणा, पेण, खरार अशा अनेक बाजर समित्यांमध्ये ८ ते १५ रुपये किलोपर्यंत भाव पोहोचला आहे. १ – २ रुपये किलोएवढी ही स्थिती बिकट नसली तरी मात्र, या सध्याच्या भावात सुद्धा शेतकऱ्यांचा खर्चही वसूल होत नाही. मागील काही दिवसात कवडीमोल भावात कांद्याची विक्री झाली तर काही शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा टाकला परंतु आता भाववाढीत सुधारणा होताना दिसत आहे.
कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशात अव्वल
आता हळूहळू भाव आणखी वाढण्याची आशा शेतकऱ्यांना आहे. परंतु, अनेक शेतकऱ्यांचे कांदे खराब झाले आहेत. त्यामुळे उत्पन्नात घट होणार आहे. अशा स्थितीत जुलैमध्ये भाव वाढण्याची शक्यता अधिक आहे. महाराष्ट्रातील सुमारे १५ लाख शेतकरी कुटुंबे कांदा लागवडीशी संबंधित आहेत. देशातील सर्वात मोठा कांदा उत्पादक महाराष्ट्र आहे. देशातील सुमारे ४३ टक्के कांद्याचे उत्पादन येथे होते.
योग्य हमी भाव मर्यादा मिळणार का
या बद्दल माहिती देताना महाराष्ट्र कांदा उत्पादक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भरत दिघोळे भावात थोडीफार सुधारणा झाल्याचे सांगतात. मात्र अद्यापही त्यांचे नुकसान भरून निघालेले नाही. गेल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांना कमी भाव मिळत असल्याने नुकसानभरपाई मिळणे कठीण झाले आहे. गेल्या दोन हंगामात चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. राज्यातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये सध्या कांद्याचे भाव वाढत आहेत. आता मोजक्याच ठिकाणी किमान भाव एक – दोन रुपये प्रति किलो झाला आहे. जोपर्यंत शेतकऱ्यांना किमान ३० रुपये किलोचा भाव मिळत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांना कांदा लागवडीत नफा मिळणार नाही.
अजून कांद्याचे भाव वाढणार का
काही जाणकार सांगतात की, यावर्षी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचे नुकसान झाले आहे. त्यात आता आणखीनच वाढ होत आहे, त्यामुळे येत्या काही दिवसांत मंडईंमध्ये कांद्याची आवक कमी होऊन भावात आणखी सुधारणा दिसून येईल. शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून सरकारने कांद्यालाही एमएसपीच्या कक्षेत आणले तर चांगले होईल. ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे त्यांना सरकारने लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी.
कांद्याला कोणत्या बाजारात किती दर मिळाले
७ जून रोजी कल्याण बाजार समितीत ३ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान भाव १२०० रुपये, कमाल भाव १४०० रुपये आणि सर्वसाधारण किंमत १३०० रुपये प्रति क्विंटल होती.
मुंबई बाजार समितीत ११०६२ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान भाव ६००, कमाल १५०० आणि सर्वसाधारण भाव १००० रुपये प्रति क्विंटल होती.
पारनेर बाजार समितीत ८९१३ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान भाव ६००, कमाल १६०० आणि सर्वसाधारण भाव ९५० रुपये प्रति क्विंटल होती.
सातारा बाजार समितीत २०९ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान किंमत ८००, कमाल १२०० आणि सर्वसाधारण भाव १००० रुपये प्रति क्विंटल होती.
जुन्नर बाजार समितीत ११५५० क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान किंमत ८००, कमाल १६०० आणि सर्वसाधारण भाव ११०० रुपये प्रति क्विंटल होती.
खेड बाजार समितीत १०० क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान किंमत ७००, कमाल ११०० आणि सर्वसाधारण भाव ९०० रुपये प्रति क्विंटल होती.
पिंपळगाव बसवंत बाजार समितीत ३६२५० क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान भाव २००, कमाल १७०० आणि सर्वसाधारण भाव १०५० रुपये प्रति क्विंटल होती.
पेण बाजार समितीत ६९९ क्विंटल कांद्याची आवक झाली. येथे किमान भाव १२००, कमाल १४०० आणि सर्वसाधारण भाव १२०० रुपये प्रति क्विंटल होता.
या प्रमाणे कांद्याच्या बाजारभावात सुधारणा होत असली तरी शेतकऱ्यांना अजून भाव वाढीची अपेक्षा आहे कारण शेतकरी मागील काही दिवसांपासून आर्थिक अडचणीत सापडला आहे आता बाजारभावात सुधारणा होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता नक्कीच कमी होण्यास मदत होईल.