लोकक्रांती ऑनलाइन
Panjab Dakh : गुरुवार २९ जून रोजी पंजाब डख यांनी नवीन हवामान अंदाज व्यक्त केला शेतकऱ्यांसाठी ही माहिती महत्वाची ठरणार आहे. राज्यात पावसाला सुरुवात झाली परंतु अजूनही काही भागात पाऊस झालेला नाही. चक्रीवादळा मुळे राज्यात पाऊस लांबणीवर पडला होता आता हवामान पूर्ववत होताना दिसत आहे. जुलै महिन्यात पाऊस कसा राहणार हे डख यांनी सांगितले.
पंजाब डख यांनी वर्तवलेले अंदाज खरे ठरले
पंजाब डख यांच्या मागील अंदाजनुसार २५ जून पासून राज्यात भाग बदल पावसाला सुरुवात होणार आहे आणि शेतकऱ्याच्या पेरण्या देखील होणार आहेत असा अंदाज दिला होता आणि त्यामध्ये एक असा अंदाज सांगितला होता की त्यांनी मागील काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं की सर्व शेतकऱ्यांना २७ जून आणि २८ जूनला बरेच शेतकरी सोयाबीन पेरणी करताना दिसतील. हा अंदाज खरा होताना आता दिसत आहे.
आज कुठे कुठे पाऊस पडणार आणि किती पडणार
पंजाब डख यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्व शेतकऱ्यांसाठी नवीन हवामान अंदाज सांगितला आहे राज्यात २९ जून रोजी मुंबई, नाशिक, उत्तर महाराष्ट्र, कोकणपट्टी तसेच पुणे, सातारा, सांगली या भागांमध्ये सगळीकडे आज थोडा जोराचा पाऊस पडणार आहे. पंढरपूर येथे ही आज थोड्याफार प्रमाणात पाऊस पडणार आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये २ जुलैपासून ते १० जुलैपर्यंत जास्त पाऊस पडणार आहे.
या भागात भाग बदलत पाऊस होणार
राज्यामध्ये पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस २९ जून, ३० जून आणि १ जुलै पर्यंत भाग बदलत पडणार आहे. परंतु या भागातील शेतकऱ्यांनी चिंता करण्याचे कारण नाही जुलै महिन्यात बराच पाऊस होणार आहे.
जुलै महिन्यात किती पाऊस पडणार
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे जुलै महिन्यामध्ये पावसाचा खंड पडणार नाही. जुलै महिन्याच्या पहिल्या व दुसऱ्या आठवड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. जवळ जवळ १५ जुलै पर्यंत राज्यात पाऊस पडणार आहे हा पाऊस अखंड असणार आहे. २ जुलै पासून ते ९ जुलै पर्यंत विदर्भ, पूर्व विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा असणार आहे सगळीकडे भाग बदलत सरीवर सरी कोसळणार आहेत.
शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी पाऊस अडथळा आणणार नाही
राज्यामध्ये २ जुलैपासून जवळपास ८ जुलै पर्यंत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये खूप पाऊस पडणार आहे. शेतकऱ्यांची या पावसामध्ये पेरणी देखील होणार आहे. आणि पेरणी पासून जरी काही शेतकरी वंचित राहिले तर त्यांची पेरणी १५ जुलै च्या आत होऊन जाणार आहे. सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या होणार आहेत आणि आता देखील पेरण्या चालू झालेल्या आहेत. सगळीकडेच पेरण्या चालू झालेल्या आहेत त्यामुळे सर्व शेतकऱ्यांच्या पेरण्या १५ जुलै पर्यंत होतील असंही डख यांनी सांगितले.