लोकक्रांती
श्रीगोंदा, दि. ३० जुलै २०२४ :
राहुल विद्यार्थी वस्तीगृहातून बहुजन चळवळीची निर्मिती होणार असे प्रतिपादन बहुजन समता पत्राचे संपादक चंदन घोडके यांनी केले ते वस्तीगृहात वाढदिवसा निमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी पत्रकार राजू शेख होते. यावेळी बहुजन समता पत्राच्या उपसंपादक मनीषा घोडके, आपली चर्चा यूट्यूब चैनल चे अमर घोडके इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले की या वस्तीग्रह मध्ये सर्व जाते धर्माचे मुले गुन्ह्या गोविंदाने राहतात.राहुल विद्यार्थी वस्तीग्रहाचा इतिहास मोठा आहे. वस्तीगृहाच्या माध्यमातून अनेक प्रशासकीय अधिकारी घडले आहेत. त्यांनी वस्तीगृहाची नवनिर्मितीसाठी योगदान देणे काळाची गरज आहे.देशसेवेसाठी जवान आपल्या प्राणाचे बलिदान देतात.त्याचप्रमाणे मीही माझ्या शेवटच्या क्षणापर्यंत वंचित घटकांना न्याय देण्यासाठी लढतच राहणार आहे. वस्तीग्रहासाठी वेळोवेळी मदत करणार असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतीश ओहोळ यांनी केले तर सम्यक गायकवाड याने आभार मानले.
चौकट
यावेळी संपादक चंदन घोडके यांना महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षा ताई रुपवते यांनी वाढदिवसानिमित्त भ्रमणध्वनी द्वारे शुभेच्छा दिल्या.