२०१४ साली विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला व श्रीगोंदा नगर मतदार संघाच्या इतिहासात श्रीगोंदा तालुक्यातुन पहिल्या महिला उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी केली – सौ. रत्नमाला शिवाजी ठुबे
श्रीगोंदा, ता. १३ : श्रीगोंदा – नगर विधानसभे मध्ये २०२४ च्या निवडणुक रिंगणात १६ उमेदवार आहेत त्यामध्ये अनुक्रमांक १३ च्या अपक्ष उमेदवार सौ.रत्नमाला शिवाजी ठुबे या आहेत. शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांना जीवनात अन्याय झाल्यावर ज्या समस्या निर्माण होतात त्याला वाचा फोडण्यासाठी व न्याय देण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे २२६ – श्रीगोंदा नगर विधानसभा मतदारसंघाच्या अपक्ष उमेदवार सौ. रत्नमाला शिवाजी ठुबे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना सांगितले.
१९९१ पासुन मी रयत शिक्षण संस्थेत सेवा करत असताना सन २०११ मध्ये माझ्या बदली संदर्भात चुकीचे पद्धतीने झालेल्या अन्यायामुळे मला घरी बसावे लागले. माझ्यावर झालेल्या अन्यायाविरोधात संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांचेकडे न्याय मिळण्यासाठी पाठपुरावा केला परंतु मला न्याय मिळाला नाही म्हणून २०२१ नंतर संस्थेच्या विरोधात कोर्टाकडे दाद मागितली आहे. संस्थेतुन घरी बसल्याने रिकाम्या वेळात वृत्तपत्र वाचन करत असताना शेतकरी व माझ्या सारख्या व्यक्तींवर समाजात होणाऱ्या अन्यायाविरोधात आवाज उठविण्यासाठी मी २०१४ साली विधानसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय घेतला व श्रीगोंदा नगर मतदार संघाच्या इतिहासात श्रीगोंदा तालुक्यातुन पहिल्या महिला उमेदवार म्हणून अपक्ष उमेदवारी केली. त्यावेळी सर्व अपक्ष उमेदवारात एक नंबरची मते मिळाली.
यावेळी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मी उमेदवारी करत असून माझा प्रचार जोरात चालू आहे नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याने मीच निवडुण येणार आहे असा मला विश्वास आहे. श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदारसंघात मी अपक्ष उमेदवारी करत असून माझा या निवडणुकीमध्ये अनुक्रमांक १३ असून येत्या २० नोव्हेंबरला ऊस शेतकरी या चिन्हा समोरील बटन दाबून मला विजयी करावे असे आवाहन यावेळी रत्नमाला शिवाजी ठुबे यांनी केले.