नागवडे कुटुंबीयांचा श्रीगोंद्याच्या आमदारकीवर सर्वाधिक नैतिक अधिकार – सुनील भोस

बहुरंगी लढतीत सर्वाधिक मेरिट असणारे उमेदवार म्हणून सौ. अनुराधा नागवडे यांच्याकडे जनता आशेने पाहत आहे.त्यांना आमदार करण्यात तालुक्यातील प्रत्येक लहान-मोठ्या घटकांचा हातभार लागत आहे – सुनील भोस

श्रीगोंदा, ता. १७ : श्रीगोंदा – नगर विधानसभा मतदार संघामध्ये निवडणूक प्रचार आता शेवटच्या टप्प्यामध्ये आला आहे, महाविकास आघाडीच्या उमेदवार अनुराधा नागवडे यांचा प्रचारा मध्ये आढळगाव,भावडी, कोकणगाव, चांडगाव या गावांच्या दौऱ्यावर असताना श्रीगोंदा वकील संघाचे माजी अध्यक्ष व श्रीगोंदा साखर कारखान्याचे माजी संचालक ॲड. सुनील कांतीलाल भोस हे म्हणाले श्रीगोंदा तालुक्याच्या जडण घडणीत दिवंगत आमदार शिवाजीराव नागवडे व त्यांच्या कुटूंबियांचे सर्वाधिक योगदान असून,आमदारकीवर सर्वात जास्त नैतिक अधिकार नागवडे कुटूंबियांचा आहे.

पुढे बोलताना ॲड. भोस म्हणाले की, विधानसभा निवडणूक बहुरंगी होत आहे. बॅलेट मशीनवर जसे सर्वात प्रथम नाव सौ.अनुराधा राजेंद्र नागवडे यांचे आहे हा एक शुभ शकुन आहे की निकालात देखील सौ.नागवडे यांचा क्रमदेखील सर्वात वर असणार आहे.कै. शिवाजीराव बापू नागवडे यांनी तालुक्यात विकासाची गंगा आणली.सुमारे पाऊण शतक त्यांनी अहोरात्र विकासकामे केली.त्यांच्या पराकाष्ठेमुळे सध्या तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. बापुंच्या स्वप्नातील तालुका घडविण्यासाठी आता त्यांच्या स्नुषा सौ.अनुराधा वहिनी निवडणुकीस उभ्या आहेत.त्यांना आमदार करून श्रीगोंदा तालुका राज्याच्या नकाशात उच्चस्थानी नेण्याची अपूर्व संधी चालून आली आहे.

बहुरंगी लढतीत सर्वाधिक मेरिट असणारे उमेदवार म्हणून सौ.नागवडे यांच्याकडे जनता आशेने पाहत आहे.त्यांना आमदार करण्यात तालुक्यातील प्रत्येक लहान-मोठ्या घटकांचा हातभार लागत आहे.

नागवडे कुटूंबियांची खासियत म्हणजे त्यांनी आजवर सदैव दिलेला शब्द पाळलेला आहे. मविआच्या जाहीरनाम्यात व शिवसेना (उबाठा) च्या वचननाम्यात दिलेल्या आश्वासनांची पुर्ती करण्याचे काम सौ.नागवडे या करतील २०१४ साली कै. बापू यांनी केलेल्या त्यागामुळेच तालुक्यात सत्ताबदल झाला.बापूंच्या त्यागातून ज्यांनी आमदारकी मिळवली त्यांना पुढे सत्तेची ऊब लागल्यावर या त्यागाचा विसर पडला.कुकडी साखर कारखान्याची उभारणी व २०१४ ला मिळालेली आमदारकी यात नागवडे कुटूंबियांचे लाख मोलाचे योगदान आहे. त्याची उतराई करण्याची संधी अपक्ष उमेदवाराला आली होती.मात्र उतराई न करता नागवडेंना आडकाठी करण्यात त्यांनी धन्यता मानली.त्यांच्या या कृतीची तालुक्यात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.मतपेटीतून जनता त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.सर्व बाबींचा विचार करता सौ नागवडे यांचा मोठ्या मताधिक्याने विजय होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ असल्याचा दावा ॲड. भोस यांनी बोलताना केला आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
broken clouds
25.4 ° C
25.4 °
25.4 °
79 %
7.3kmh
76 %
Mon
34 °
Tue
34 °
Wed
34 °
Thu
35 °
Fri
32 °
error: Content is protected !!