पायी दिंडी वारी खर्चात घोटाळा; संभाजी ब्रिगेडकडून कारवाईची मागणी

अहिल्यानगर, दि. १३ सप्टेंबर २०२५ :
पंढरपूर पायी दिंडी वारीसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. मात्र या निधीच्या खर्चात प्रचंड गैरव्यवहार, अपहार आणि भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. या संदर्भात जबाबदार अधिकाऱ्यांच्याच हात भ्रष्टाचाराने बरबटलेले असल्याने सर्वसामान्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

संभाजी ब्रिगेडने या घोटाळ्याचे पुरावे गोळा केले असून येत्या सोमवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांना भेटून अधिकृत तक्रार सादर करणार आहेत. त्यावेळी सर्व पुरावे सादर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होणार आहे. याशिवाय संबंधितांवर गुन्हे दाखल करून जबाबदार अधिकाऱ्यांवरही खटले चालविण्याची मागणी करण्यात येणार आहे.

संभाजी ब्रिगेडने ठाम भूमिका घेताना म्हटले आहे की, “शासनाचा निधी हा जनतेच्या करातून जमा होतो. तो पैसा समाजहितासाठी वापरला जाण्याऐवजी भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या खिशात गेला, तर जनता कधीच गप्प बसणार नाही. पायी दिंडी वारी ही भक्तीची, परंपरेची व श्रद्धेची वाटचाल आहे. त्या पवित्रतेवर भ्रष्टाचाराचा डाग लावणाऱ्यांना कडक शिक्षा झालीच पाहिजे.”

सोमवारी जिल्हा परिषदेला दिल्या जाणाऱ्या भेटीनंतर पुढील लढ्याची दिशा जाहीर करण्यात येणार असल्याचे संभाजी ब्रिगेडने स्पष्ट केले आहे.

Team Lokkranti

हे देखील वाचा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

आजचे तापमान

Shrīgonda
light rain
25.9 ° C
25.9 °
25.9 °
75 %
5.9kmh
100 %
Sat
27 °
Sun
22 °
Mon
23 °
Tue
26 °
Wed
28 °
error: Content is protected !!