टीम लोकक्रांती : श्रीगोंदा दि.१ ऑक्टोबर २०२२ : श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथील पाचवीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलाचे अपहरण करून नेत आहेत. याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला गेली दोन दिवसांपूर्वी अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता.मात्र पोलिसांनी सखोल चौकशी केली असता. अल्पवयीन मुलाने अतिशयोक्ती व चुकीची माहिती दिली असल्याचे स्थानिक चौकशी केली असता अपहरण हे झालेच नाही असे माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, श्रीगोंदा तालुक्यातील अजनुज (आनंदवाडी) येथे दि. २८ सप्टेंबर रोजी शाळकरी मुलाला पळून नेण्याच्या संशयावरून तसेच चाकू दाखवून दमदाटी केल्याचे मुलाच्या सांगण्यावरून ग्रामस्थांनी नासिर गुलाब पठाण व हरिभाऊ दत्तू वाळुंज या दोन तरुणांना मार हान करत पोलिसांच्या ताब्यात दिले होते. तसेच या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी या दोघांच्या विरोधात पोलीस स्टेशनला फिर्यादही दाखल केली होती. तसेच मारण केल्या प्रकरणी व गाडीची तोडफोड केल्याप्रकरणी पाच ते सहा जणांच्या विरोधात गाडी चालवणे देखील विरोधी फिर्याद दाखल केली होती.
मात्र या अपहरण प्रकरणाचे पोलीस तपास करत असताना स्थानिक व्यक्तींनी त्या मुलाचे अपहरण केले नव्हते तर तो मुलगा स्वतः होऊन त्या गाडीत बसला होता तसेच त्यास चाकू देखील दाखवला नव्हता तुझी किडनी काढून घेऊ असे देखील वक्तव्य कोणी केले नव्हते या बाबी पोलीस तपासात उघड झाले असून त्या मुलाने अतिशयोक्ती करून सांगितले आहे. ही घटना घडली असल्याचे श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी सांगितले तसेच नागरिकांनी सतर्क राहून संशयित व्यक्ती आढळून आल्यास पोलीस ठाण्याची संपर्क करावा मात्र कायदा हातात घेऊ नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असेही ढिकले यांनी आव्हान केले आहे. या अपहरण प्रकरणाच्या आरोपीच्या विरोधात गाडीमध्ये विनापरवाना महाराष्ट्र शासन नावाची पाटी आढळून आल्याने शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी भादवी कलम ४२० प्रमाणे आणि मुंबई दारूबंदी अधिनियम ८५ नुसार व मोटार अधिनियम दारू पिऊन वाहन चालवणे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग हे करीत आहेत.
स्त्रोत:(प्रेस नोट)